Visitors: 235813
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्काराने गौरव

  team jeevandeep      02/01/2025      sthanik-batmya    Share


रक्तदानाने नवीन वर्षाचे स्वगात*

कल्याण : रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र या धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्थेमार्फ़त इंग्रजी नववर्षाचे स्वागत मध्यरात्रीच्या रक्तदानाने करण्यात आले. शतकोत्तर रक्तदाते रविन्द्र कडणे, शाहू कदम, मंतोष मिश्रा यांच्या सह या वर्षाचा राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरष्कार उल्हासनगर येथील डॉ प्रकाश माळी यांच्या 30 वेळा केलेल्या रक्तदानाबद्दल यांना प्रदान करण्यात आला.

 कार्यक्रमाला धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, जिल्हा प्रमुख धनंजय बोडरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, माजी महापौर रमेश जाधव, उपजिल्हा प्रमुख तात्या माने, विजय देसाई, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पलांडे, पुरुषोत्तम चव्हाण, अशोक म्हात्रे, हेमंत चौधरी, किरण निचळ, उपशहर संघटिका सुनीता ढोले, शेखर पिसाळ, अमित उगले, पंकज पांडे, सागर वाळवे, संगीता गांधी, मीनाक्षी कटके,नलिनी कदम, प्रतीक महिले, अभय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

जर कोणी कोणाचा जीव वाचवला तर सरकार त्याला शौर्य पदक देऊन सत्कार करते परंतु  निस्वार्थ सेवाभावाने केलेल्या रक्तदात्यांच्या रक्ता मुळे अप्रत्यक्ष रित्या गरजु रुग्णानांचे प्राण वाचवले जातात. दोघेही व्यक्ति प्राण वाचवणारे असतात परंतु एकाला शौर्य पदक दिला जातो आणि एकाची दखल घेतली जात नाही ही शोकांतिका आहे. रक्तानंद हे व्यासपीठ अश्या रक्तदात्यांचा सन्माना करीता रक्तदानाची चळवळ उभी करत आहे अश्या रक्तदात्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केले.

कार्यक्रमात माजी नगरसेवक तथा शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख महेश  गायकवाड़ यांची उपस्थिति सर्वांचा विशेष लक्ष वेधुन घेत होती. आज जर दिघे साहेब असते तर मी केव्हाच आमदार झालो असतो परंतु हे व्यासपीठ दिघे साहेबांच्या शिकवणीने भारवलेले आहे. रक्तदानसारखे पुण्याचे कार्य 29 वर्ष पर्यंत सातत्याने चालवणे अशक्य असताना रक्तानंद ग्रुपचे संयोजक नारायण पाटिल व त्यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख अ‍ॅड. नीरज कुमार सहित सर्व कार्यकर्त्यांनी शक्य केले.  तसेच पुढील महोत्सवी वर्षात सर्व पक्षीय सहभागी होतील असा विश्वाश महेश गायकवाड़ यानी दर्शवला.

 मध्यरात्रीच्या या शिबिरामधे तिनशे पेक्षा अधिक रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्दान केले. नवीन वर्ष सुरू होताच फटाक्याच्या आतिश बाजिने उपस्थितितांचे लक्ष वेधले. कार्यक्रम यशश्वी पार पडण्यासाठी संयोजक नारायण पाटील, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. नीरज कुमार, भूपेंद्र अहिरे, शांताराम डिगे, रविंद्र कडणे, अप्पा अतकरे, प्रमोद गायकवाड, दत्ताराम नार्वेकर, आसिफ शेख, दिनेश साळूखे, संजय पेंढारे, यांनी अथक परिश्रम घेतले.

+