team jeevandeep 30/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील नवनिर्वाचित अनुज्ञापन निरीक्षकांचा स्नेहमेळावा बदलापूर येथील गंगानंद फार्म येथे उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश सर्व निरीक्षकांमध्ये ओळख आणि संवाद वृद्धिंगत करणे तसेच भविष्यात संघटित राहून महानगरपालिकेच्या कार्यांमध्ये अधिकाधिक प्रामाणिकता व एकात्मता निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान सहभागी निरीक्षकांनी आपापले अनुभव व समस्यांचे मांडणी केली आणि त्यावर एकत्रितपणे चर्चा केली. यामध्ये समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्यात आल्या. या संवादाच्या माध्यमातून एकजुटीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व नवनिर्वाचित निरीक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या योगदानाने स्नेहमेळावा एक आदर्श उपक्रम ठरला. या स्नेहमेळाव्यामुळे भविष्यकालीन कामकाजासाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.