Visitors: 390932
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

डीएडच्या विद्यार्थ्यांनी चाळीस वर्षांनी एकत्र भेटून साजरा केला आनंदोत्सव

  team jeevandeep      21/04/2025      sthanik-batmya    Share


पेण (प्रतिनिधी)

शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल येथील सन १९८३ते ८५ या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल चाळीस वर्षांनी एकत्र भेटले. या सर्व विद्यार्थ्यांचे स्नेह-संमेलन  आगरी मंच पेण येथे मोठ्या थाटामाटात नुकतेच संपन्न  झाले.

     सुरवातीला ईशस्तवन स्वागतपद्य गायन करून उपस्थितांचे हस्ते गणेश पुजन झाले. सुधीर मांडवकर आणि सौ. कुंदा म्हात्रे यांनी वैज्ञानिक पध्दतीने बिन वातीचा व बिन तेलाचा दिवा पाणी ओतून  प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    अशोक पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रकांत म्हात्रे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे महत्व विषद केले. सर्वांनी "40" वर्षानंतर भेटल्या बद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी ४० वर्षातील गमती जमती व सेवा करताना आलेले चांगले वाईट अनुभव विशद करून मनोरंजन पद्धतीने आनंद व्यक्त केला.प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग म्हात्रे होते.अध्यक्षस्थान  भिकाजी तांबोळी यांनी भूषवले,तर सुरेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत म्हात्रे, अशोक पाटील,कल्पना म्हात्रे, प्रदीप म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली,सुधीर मांडवकर यांनी  कार्यक्रमाचे सुरेख चित्रीकरण केले.

     अशोक पाटीलसरांनी   पसायदान गायन करून कार्यक्रमाची सांगता केली.

+