team jeevandeep 31/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दिनांक ४ ते १९ जानेवारी पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सिकलसेल हिमोफिलीया, चॅलेसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. कल्याणसह टिटवाळा, डोंबिवली, भिवंडी परिसरात ५ ते १९ जानेवारी या कालावधीत विविध २१ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरीकांनी रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.