Visitors: 391448
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केडीएमसीच्या शिक्षण विभागांतर्गत होणार असाक्षरांची परीक्षा

  team jeevandeep      22/03/2025      sthanik-batmya    Share


 कल्याण :   केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभाग योजना, जि.प.ठाणे शिक्षण विभाग योजना कार्यालय यांच्या आदेशानुसार या शैक्षणिक वर्षातील सर्वेक्षणातून ज्या असाक्षरांची नोंदणी क.डों.मनपा क्षेत्रातील शाळांनी केलेली आहे अशा एकूण 2153 असाक्षरांची परिक्षा दिनांक  रविवार, 23 मार्च2025  रोजी सकाळी 10 ते संध्या.5 या वेळेत होणार आहे. 

या परीक्षेच्या संदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या सूचना  सीआरसी प्रमुखांच्या मीटिंग मध्ये  देण्यात आलेल्या आहेत. सीआरसी प्रमुख त्यांच्या सीआरसी अंतर्गत  सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मिटिंगमध्ये या सूचना देणार आहेत. परीक्षा केंद्रांना जिल्हा, तालुका,मनपास्तरावरील अधिकारी ,शिक्षण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी तसेच सीआरसी प्रमुख भेटी देऊन माहिती घेणार आहेत.

या परीक्षेच्या संदर्भातील सूचना देण्यासाठी शुक्रवार दि. 20मार्च 2025  रोजी सीआरसी प्रमुखांची मीटिंग घेऊन त्यामध्ये शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी  रमेश चव्हाण  तसेच शिक्षणाधिकारी  विजय सरकटे ,विषयतज्ञ चंद्रमणी सरदार तसेच टेक्नोसेवी शिक्षक  विलास लिखार यांनी मार्गदर्शन केले तसेच विषयतज्ञ  संतोष पाटील व  गुरुनाथ इसामे यांनी परीक्षेचे साहित्य वाटप केले, तसेच या परीक्षे संदर्भात  जनजागृती व्हावी जेणेकरून जास्तीत जास्त असाक्षर परीक्षेस उपस्थित राहतील असे आवाहनही शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी केले आहे.

+