Visitors: 235865
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

केंन्द्रिय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट

  team jeevandeep      04/01/2025      sthanik-batmya    Share


अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण

 केंन्द्रिय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट

 कल्याण : कल्याण पूर्वेतील घडलेल्या  अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणात  आरोपी विशाल गवळी याला अटक झाली. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध होत आहे. शुक्रवारी केन्द्रिय मंत्री रामदास आठवले यांनी कल्याण पूर्व परिसरात येत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  

यावेळी बोलतांना आठवले यांनी सांगितले की, महाराष्ट्रात लहान मुलींवर महिलांवर अत्याचारांच्या घटना होत आहेत माणुसकीला कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत. त्या घटना मधील घटना कल्याणच्या कोळशेवाडी मधील अत्यंत निर्घृण पद्धतीचे घटना घडली आहे.  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.

मी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे कुटुंबाने मला माहिती दिली आहे. हा आरोपी गुंड प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर वेळेत कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता

ज्या इमारतीमध्ये हा नराधम राहतो त्या बिल्डिंगला महानगरपालिकेने तोडण्याची नोटीस दिली आहे. काही कुटुंबांनी या इमारतीतील घर खाली केली आहेत.

ही इमारत ताबडतोब पाडण्यात यावी अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आरोपींना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे. आरोपीला साथ देणारी त्याची पत्नी तिला देखील फाशी झाली पाहिजे. लोकांचा आक्रोश आहे लोकांची मागणी आहे. मुख्यमंत्री फंडातून या कुटुंबांना मदत मिळावी

ही घटना योग्य नसून या घटनेचा मी निषेध करतो. सामाजिक न्यायचा मंत्री म्हणून या घटनेचा निषेध करतो अशा पद्धतीच्या घटनांना थांबवणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी सांगितले.

+