team jeevandeep 02/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : शिधापत्रिका अधिका-याच्या हलगर्जीपणामुळे एक महिलेचे उपचारा अभावी निधन झाले असल्याने कल्याण शिधापत्रिका अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांना निवेदन देत शिवसेना उबाठा गटाचे विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांनी केली आहे.
शिधापत्रिका अधिका-याच्या हलगर्जीपणामुळे एक महिलेचा उपचारा अभावी निधन झाले आहे. कल्याण
पश्चिम येथील जुना मच्छी बाजार च्या मरियम चाळीत राहणा-या फिरदोस अब्दुल कलाम अंसारी नावाच्या
महिलेच्या 02/04/2024 रोजी छातीत दुखायला लागला. उपचारा साठी महिलेला कल्याणच्या मीरा रूग्णालयात भर्ती केले पण तिथल्या चिकित्सकांनी जो खर्च सांगीतला तो त्या महिलेच्या नातेवाईकांना परवडणारा नव्हता.
नातेवाईकांनी शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी धावपळ सुरू केली. त्या साठी रेशन कार्ड पाहिजे होते. पंरतु रेशन कार्ड गहाळ झाल्याने ते मिळत नव्हते, त्याची फक्त झेराँक्स प्रत नातेवाईकांकडे होती. नातेवाईकांनी त्या झेराक्स च्या आधारे शिधापत्रिका अधिका-याला विनंती केली की आम्हाला झेराँक्स च्या आधारे नवीन शिधापत्रिका तात्काळ बनवून द्या. पण शिधापत्रिका अधिका-याने काही लक्ष दिले नाही.
कार्यालयातील काही कर्मचारी महिलेच्या नातेवाईकांकडून आर्थिक अपेक्षा ठेऊन पाच दिवसांनी या असे सांगितले, पांच दिवसांनी गेल्यावर आठवड्या नंतर या असे बोलायला लागले. महिलेच्या नातेवाईकांकडून नवीन शिधापत्रिका साठी दहा ते पंधरा हजार रूपयांची मागणी केली जात होती. हि सगळी धावपळ करताना महिलेचा उपचारा अभावी निधन झाले.
योग्यवेळी महिलेला शिधापत्रिका मिळाली असती तर कदाचित महिलेचे प्राण वाचले असते. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूला कल्याणचे शिधापत्रिका अधिकारी जवाबदार असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून शिधापत्रिका अधिका-यावर
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन रूपेश भोईर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दिले आहे.