team jeevandeep 27/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : १३ वर्षीय निरागस मुलीच्या आयुष्याचा क्रूर अंत करणाऱ्या अमानुष घटनेने साऱ्या महाराष्ट्राला हादरवले आहे. तिच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराची आणि निर्घृण हत्येची वेदना शब्दांपलीकडची आहे. समाजात वाढणारी ही हिंसा थांबवण्यासाठी आणि या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कल्याण पूर्वेतील सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत कॅण्डल मार्च काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
कॅण्डल मार्चमधून निघणारी प्रत्येक ज्योत तिच्या न्यायासाठी आणि या व्यथित आत्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. आज न्यायाची मागणी करत आहोत, पण उद्या कुणा निरागस जीवाला या वेदना सहन कराव्या लागू नयेत यासाठी सजग राहूया. अशा पाशवी प्रवृत्तींचा अंत होणारच, पण त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली.