Visitors: 235825
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

"HMPV विषाणुपासुन बचाव करण्यासाठी केडीएमसीच्या सूचना

  team jeevandeep      10/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत केडीएमसी कार्यक्षेत्रातील जनतेला सुचित करण्यांत येते की, चीनमध्ये असलेला विषाणु एचएमपीव्ही तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. मानवी मेटान्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणु आहे. ज्यामुळे श्वसन मार्गातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभुत ठरते. हा एक हंगामी आजार आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्ल्यु प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.

संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वेगाने पसरु शकतो. संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसाचा आहे. लहान मुले, वृध्द  आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. याबाबत नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत याबाबत जनजागृती करण्यांत येत आहे. तसेच याबाबत लक्षणाप्रमाणे असणारे औषधे उपलब्ध आहेत.

नागरीकांनी खबरदारीचा एक भाग म्हणुन श्वसनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी "काय करावे, काय करू नये" यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कडोंमपा कार्यक्षेत्रातील जनतेला खालीलप्रमाणे सुचना देण्यांत येत आहे.

जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यु पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने आपले हात वांरवांर धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणा पासुन दुर रहा. भरपुर पाणी प्या आणि पौष्टिक खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (Ventilation) होईल याची दक्षता घ्या.

हस्तांदोलन करू नका. टिश्यु पेपर आणि रुमालाचा पुर्ण वापर, आजारी लोंकाशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वांरवार स्पर्श करणे हे करू नये. नागरीकांनी घाबरुन जाऊ नये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळुन आल्यास ताबडतोब नजीकच्या दवाखान्यात, रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल  यांनी केले आहे.

+