Visitors: 390750
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” अभियानाचा ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात शुभारंभ

  Team jeevandeep      01/05/2025      sthanik-batmya    Share


KAMPOST 

ठाणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या विशेष स्वच्छता अभियानाला १ मे २०२५ रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामस्तरावर सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून गाव स्वच्छ ठेवण्याची सवय निर्माण करणे हा आहे.

प्रमुख उपक्रम आणि सहभाग:

त्यानंतर गावातील महिलांना निळ्या व हिरव्या डस्टबिनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्षात नाडेप पद्धतीने कंपोस्ट खड्डा भरण्याचा उद्घाटनपर कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, महिला बचत गट, विस्तार अधिकारी तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानाचे कालावधी आणि उद्दिष्टे:

या अभियानाचा कालावधी १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ असून, त्यात खालील टप्प्यांत काम केले जाणार आहे:

• ओल्या कचऱ्याचे संकलन व नाडेप पद्धतीने खत निर्मिती

• ग्रामपातळीवर स्वच्छतेच्या सवयींचा विकास

• पर्यावरण रक्षण आणि पुनर्वापराविषयी जागरूकता

• जनसहभागातून श्रमदान आणि सामूहिक जबाबदारीची भावना

प्रशासनाची भूमिका आणि आवाहन:

        ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक प्रमोद काळे यांनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा असे आवाहन केले आहे.

       या उपक्रमामुळे ग्रामीण भागात जैविक खत निर्मिती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता जनजागृती आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य होणार आहे.“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या अभियानात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.

+