Visitors: 390725
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

आमदार राजेश मोरे यांनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत !

  team jeevandeep      06/05/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली :

देशाच्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्याव्यात असे आदेश राज्यसरकारला मंगळवारी दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केलेच पाहिजे कारण अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिका माध्यमातून प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता या निर्णयामळे निवडणुका होवून लोकप्रतनिधींच्या माध्यमातून योग्य विकास कामे होतील

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले येथील पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक होण्यासाठी अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पहात आहेत. त्यांना निवडणुकीच्या उत्सवात भाग घेता येईल आणि त्यांनाही लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. कारण लोकनियुक्त प्रतिनिधी  महापालिकेवर असणे  आवश्यक आहे असेही मोरे यांनी सांगितले.

+