Visitors: 390955
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

ठाणे जिल्ह्याला मेट्रोची आणखी काही वर्षे प्रतीक्षा, कल्याण-तळोजा मेट्रोचे काम तीन टक्केच

  team jeevandeep      13/03/2025      mahatvachya-batmya    Share


ठाणे :

ठाणे जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम ३ टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली असून या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

+