Visitors: 226918
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

  team jeevandeep      07/04/2025      mahatvachya-batmya    Share


अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा धक्का देत या प्रकरणात पोलिसांवार गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. या प्रकरणात अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती मात्र आता मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) t) दिलेल्या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्य सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे.

अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार अशी भूमिका सरकारने घेतली होती. तर दुसरीकडे या सरकारच्या या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत आज या प्रकरणाचा निकाल देत मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांना देण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले आहे. या आदेशानंतर आता पुढील दोन दिवसात या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे आणि स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.

अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार अशी भूमिका सरकारने घेतली होती. तर दुसरीकडे या सरकारच्या या भूमिकेवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त करत आज या प्रकरणाचा निकाल देत मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांना देण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले आहे. या आदेशानंतर आता पुढील दोन दिवसात या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे आणि स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.

चौकशीसाठी जाताना मुंब्रा येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 2 गोळ्या झाडले तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडले असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

+