team jeevandeep 03/05/2025 mahatvachya-batmya Share
कल्याण :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून पडघा भादाणे ते मुरबाड तालुक्यातील मालेगांव पर्यंत इलेक्ट्रोड टॉवर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु यातील बाधित शेतकऱ्यांना ना नोटीस, ना काही सूचना न देताच जबरदस्तीने सुरू असलेले लाईन टाकण्याचे कामाच्या विरोधात शिवसेना (उबाठा )ने कंबर कसली असून आज वाहोली येथे शेतकऱ्यांचे निषेध अंदोलन करण्यात आले, यावेळी शासनाचा निषेध करून जो पर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत विद्यूत कंपनीच्या अधिकां-यांना जमीनीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड अल्पेश भोईर यांनी दिला आहे. याप्रसंगी विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकां-याना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी वाहोलीच्या शेतकऱ्यांनी टॉवर लाईन चे कामबंद पाडले होते,,तथापि कल्याण तालुक्यातील ११ते१२गावातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता, यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या पुढाकाराने बैठक झाली परंतु यामध्ये तोडगा निघाला नाही, नंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस, विद्यूत कंपनी यांना निवेदन देण्यात आले.तथापि आज कल्याण तालुक्यातील वाहोली येथे पारेषण कंपनीच्या विरोधात निषेध अंदोलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख अँड अल्पेश भोईर यांनी 'दाम नाही तर काम नाही ,असा इशारा दिला, तर शिवसेनेचे विश्वनाथ जाधव यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत शेतात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला दरम्यान या टॉवर लाईन ला रुंदे, म्हसकळ, आपटी, वाहोली,चिंचवली, उतणे, वसत, नडगाव, कुंभारपाडा, गोवेली,जांभूळ, आदी१२ते १३गावातील शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यूत पारेषण कंपनीच्या व सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या या कंपनीचे उल्हास तापकिरे आणि समीर कांबळे या अधिका-याना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे आपल्या सहका-यासह उपस्थित होते. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेश सुरोश, शरद पवार पक्षाचे अँड अविश जुवारी म्हसकळ चे श्री भोईर, आपटीचे सुनील शिसवे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.